Tumhich Tumche Bhagyavidhate (Marathi edition): Badla Bhavishya Ghadava Aayushya

· WOW PUBLISHINGS PVT LTD
5,0
1 ressenya
Llibre electrònic
80
Pàgines
No es verifiquen les puntuacions ni les ressenyes Més informació

Sobre aquest llibre

निसर्गाची कार्यपद्धती

‘कसं आहे माझं नशीब! इतके कठोर परिश्रम करूनही काहीच उपयोग नाही,’ आपणही स्वतःविषयी असा विचार करत असाल, तर हे पुस्तक नक्कीच स्वतःला भेट द्या. ही भेट आपल्या जीवनाची काया आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी सकारामक रूपात बदलू शकते.

प्रस्तुत पुस्तक आपल्या भाग्योदयाची किल्ली ठरू शकतं. गरज आहे केवळ आपल्या अनुमतीची. होय! आपल्या अनुमतीशिवाय आपलं नशीबदेखील बदलू शकत नाही. म्हणून या पुस्तकाचं वाचन करून आपलं मन भाग्योदयासाठी प्रत्येक क्षणी राजी करा.

जगात बहुसंख्य लोक स्वमत अथवा लोकमताच्या आधारे आयुष्याचे निर्णय घेत असतात. परंतु मिळालेलं मार्गदर्शन कित्येकदा लोकांना भरकटवून टाकतं. आपलं भाग्य आणि जीवनाला एक नवा आयाम देण्यासाठी, तसंच नकारात्मक भावना आणि दुर्भाग्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हे पुस्तक म्हणजे जणू एक सुवर्णसंधीच! आपण स्वतःला भाग्यवान समजा अथवा दुर्दैवी, दोन्हीही स्थितीत हे पुस्तक आपल्यासाठी वरदान ठरू शकेल. या पुस्तकाद्वारे आपण ज्या अवस्थेत असाल, तेथून अग्रेसर होऊ शकाल.

आपल्या अंतरंगात सुरू असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू प्रार्थनाच! निसर्ग मनुष्याचा प्रत्येक विचार वास्तवात बदलत असतो. पण या वास्तवापासून मनुष्य नेहमी अनभिज्ञ असतो. हे पुस्तक म्हणजे प्रार्थनेच्या शक्तीद्वारे, निसर्गनियमांनुसार आपलं आयुष्य घडवण्याचा जणू एक सुलभ उपायच!

चला तर मग, आता आपलं नशीब बदलण्याच्या, परम भाग्यशाली बनण्याच्या मार्गावर अग्रेसर होऊया. नव्या उमेदीने सर्वांसाठी भाग्योदयाचा मार्ग प्रशस्त करूया...

Puntuacions i ressenyes

5,0
1 ressenya

Sobre l'autor

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचं अध्ययन केलं. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाचं रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपलं शोधकार्य सातत्याने सुरू ठेवलं. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवलं, की अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे ‘समज’(Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचं कार्य थांबवलं आणि जवळ जवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपलं समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केलं.  


सरश्री म्हणतात, ‘‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या ‘समजे’चं श्रवणच पुरेसं आहे.’’ ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचनं दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणार्‍या या समजेचा लाभ घेऊ शकतो. 


ही समज प्रत्येकाला आपल्या अनुभवातून प्राप्त व्हावी, यासाठी सरश्रींनी ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली (सिस्टिम) तयार केली. तिचा लाभ आज लाखो लोक घेत आहेत. या प्रणालीला आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणपत्रही लाभलंय. या प्रणालीमुळेच अनेकांना सत्यमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या समजेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘तेजज्ञान फाउंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचा पाया रचला. ‘हॅपी थॉट्सद्वारे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती करणे,’ हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. 


विश्वातील प्रत्येक मनुष्य आज सरश्रींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचं बंधन नसतं. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यांतील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा (System for Wisdom) लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.


बेस्ट सेलर पुस्तक ‘विचार नियम’ शृंखलेचे रचनाकार म्हणूनही सरश्रींना ओळखलं जातं. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1 कोटीपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. याशिवाय आजवर त्यांनी विविध विषयांवर 150 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी ‘विचार नियम’, ‘स्वसंवाद एक जादू’, ‘शोध स्वतःचा’, ‘स्वीकाराची जादू’, ‘निर्णय आणि जबाबदारी’, ‘निःशब्द संवाद एक जादू’, ‘संपूर्ण ध्यान’ इत्यादी पुस्तकं बेस्ट सेलर झाली आहेत. ही पुस्तकं दहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित असून, पेंगुइन बुक्स, हे हाउस पब्लिशर्स, जैको बुक्स, मंजुळ पब्लिशिंग हाउस, प्रभात प्रकाशन, राजपाल अ‍ॅण्ड सन्स, पेंटागॉन प्रेस आणि सकाळ प्रकाशन इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारे ती प्रकाशित झाली आहेत. 

Puntua aquest llibre electrònic

Dona'ns la teva opinió.

Informació de lectura

Telèfons intel·ligents i tauletes
Instal·la l'aplicació Google Play Llibres per a Android i per a iPad i iPhone. Aquesta aplicació se sincronitza automàticament amb el compte i et permet llegir llibres en línia o sense connexió a qualsevol lloc.
Ordinadors portàtils i ordinadors de taula
Pots escoltar els audiollibres que has comprat a Google Play amb el navegador web de l'ordinador.
Lectors de llibres electrònics i altres dispositius
Per llegir en dispositius de tinta electrònica, com ara lectors de llibres electrònics Kobo, hauràs de baixar un fitxer i transferir-lo al dispositiu. Segueix les instruccions detallades del Centre d'ajuda per transferir els fitxers a lectors de llibres electrònics compatibles.