जाईजुईच्या मूळभर फुलांनी एखादी खोपी सुगंधाने दरवळून सोडावी त्याप्रमाणे या आठवणींनी मन आनंदित करून सोडले होते. शुद्ध प्रतिमेपासून चंद्राची एक एक कला वाढते आणि वद्य प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत एकएक कमी होते अष्टमीचे चांदणे पृथ्वीवर पडते. मनुष्याच्या अंत:करणातही अमावस्या आणि पौर्णिमा असतात. पण सरासरी काढली तर अष्टमीच प्रत्येकाच्या वाट्याला यायची चांगली माणसे वाईट होतात. तेव्हा शुद्ध अष्टमीचा अनुभव येतो. वद्य अष्टमी म्हणजे वाईट माणसात दिसून येणारी माणुसकी निम्मी रात्र झाल्यावर असा वद्य अष्टमीचा चंद्र उगवतो. त्याप्रमाणे वाईट माणसांच्या आयुष्यातही आत्मजागृती होत असेल या जगामध्ये आत्मजागृती आहे का? आत्मपूजनाला स्वार्थी लोकांनी दिलेले हे गोंडस नाव आहे.