या ग्रंथात ज्ञानेश्वरीतील पन्नास ओव्या विवरणासाठी निवडल्या आहेत. संत नामदेव महाराज सांगतात,
" नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी " .
ज्ञानेश्वरीतील एकेक ओवी , त्यावर गद्य-पद्यमय निरूपण आहे. भगवत् गीतेतील ज्या संस्कृत श्लोकावरील भाष्यात ज्ञानेश्वर महाराज यांनी अनेक ओव्या रचलेल्या आहेत , तो मूळ श्लोक आणि आचार्य विनोबा भावे यांची समश्लोकी आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सुयोग्य असे चित्र आहे. दैनंदिन वाचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे हे अप्रतिम पुस्तक आहे.
डाॅ. कुलकर्णी यांचे हे अध्यात्म विषयक दहावे पुस्तक असून बावीसाव्वा ललित ग्रंथ आहे. ( आयुर्वेद/आरोग्य या विषयावर ४७५ पुस्तकांचे लेखक/ संपादक आहेत )