आज बिरबल असता तर त्याने आजचे प्रश्न आपल्या अक्कल हुशारीने कसे सोडवले असते याचे दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडेल. व्यवस्थापनाला मानवी भावनांचा तोंडावळा असावा, त्यात शिस्ती बरोबरच दैनंदिन जीवनातील अडीअडचणींचे भान ठेवून वागण्याची लवचिकता असावी. नव्या कल्पनांना साकारण्यास वाव मिळेल, अशी व्यवस्था असावी. अशा किती तरी छोट्या मोठ्या गोष्टींचा आधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षणात अंतर्भाव असतो. व्यवस्थापनात वरिष्ठ स्तरांवर काम करताना त्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणतांना ज्या अंतर्व्दव्दांना सामोरे जावे लागते, त्यांचा वेध या अकबर - बिरबलाच्या कथांमधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.